|

अन्यथा पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार ; ३२ गाव कृती समितीचा इशारा.

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये टॅक्स विषय अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर “गाव विकणे आहे” अशी बॅनरबाजी करून विविध आंदोलन करण्यात आली होती. ३२ गावांमध्ये ठीक ठिकाणी मोठमोठे फलक लावून जुलमी कर भरू न शकत असल्यामुळे गावे विकणे आहे असे आशयाचे फलक लावून शासनाचा निषेध करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिकेला आदेश दिला होता की, ग्रामपंचायतीच्या धरतीवर दुपटीने कर आकारून तात्काळ पुनर्विलोकन करावे. मात्र, पुणे महापालिकेकडून आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या विलंबामुळे संतप्त झालेल्या ३२ गाव कृती समितीने इशारा दिला आहे की, मार्च अखेरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न केल्यास खडकवासला धरण क्षेत्रातील गावे पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन छेडतील.

या गावांना कोणताही निधी मिळालेला नाही, विकासकामे ठप्प आहेत, तरीही सक्तीने टॅक्स वसूल केला जात आहे. त्यामुळे या अन्यायकारक धोरणाविरोधात गावांमध्ये तीव्र नाराजी आहे. बैठकीत कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. यावेळी कृती समितीचे राहुल पोकळे, रमेश बापू कोंडे, अरुण दांगट, सुभाष नाणेकर, नितीन दांगट, राहुल पायगुडे, संजय धावडे, अतुल दांगट, नेताजी बाबर, सारंग राडकर, मारुती किंडरे, महादेव धावडे, पोपटराव खेडेकर, अविनाश लगड, रमेश करंजावणे, अनिता इंगळे, विकास दांगट, शेखर मोरे, महेंद्र दांगट, बाळू दांगट, उमेश सरपाटील, सचिन दांगट, सुभाष शिंदे, रुपेश घुले, शेखर वाल्हेकर, अनिल वांजळे, सुरेंद्र कामठे, बाळासाहेब मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!